सूर्य ग्रहण 2022 - Surya Grahan 2022 In Marathi
सूर्य ग्रहण 2022 बद्दल बोलायचे तर, 2022 मधील पहिले सूर्य ग्रहण लवकरच होणार आहे. हे ग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होईल आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम होईल कारण, सूर्य ग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे जी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार देखील महत्त्वाची मानली जाते. सूर्य हा जगाचा उर्जा घटक आहे आणि ग्रहाला जगाचा पिता आणि आत्मा म्हणतात.
जेव्हा ते ग्रहण अवस्थेत असते तेव्हा ते पीडित अवस्थेत होते आणि त्याचा परिणाम प्रत्येक जीवावर होणे स्वाभाविक आहे. जर आपण 2022 मधील सूर्य ग्रहण (सूर्य ग्रहण 2022) बद्दल बोलायचे झाले तर, या वर्षी दोन सूर्य ग्रहण होणार आहेत. पहिले सूर्य ग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्य ग्रहण होणार आहे आणि दुसरे सूर्य ग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. याला आंशिक सूर्य ग्रहण असे ही म्हटले जाईल.
अॅस्ट्रोसेज प्रस्तुत सूर्य ग्रहण 2022 चा हा विशेष लेख खास तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे. या लेखात तुम्हाला 2022 सालच्या पहिल्या सूर्य ग्रहण विषयी सर्व माहिती देण्यात आली आहे आणि हे सूर्य ग्रहण किती परिणामकारक असेल, ते कुठे दिसेल आणि वेगवेगळ्या राशींमध्ये जन्मलेल्या लोकांवर किती परिणामकारक असेल हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सूर्य ग्रहणाचा संभाव्य परिणाम काय असेल. कोणती राशी असेल, सूर्य ग्रहणाचा फायदा कोणाला होईल? या सर्व गोष्टी पूर्णपणे जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी, 2022 च्या पहिल्या सूर्य ग्रहणाशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी जाणून घेऊया.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
सूर्य ग्रहण 2022 ची तिथी आणि वेळ
पंचांगानुसार सूर्य ग्रहणाची गोष्ट केली तर, वर्ष 2022 चे पहिले सूर्य ग्रहण भारतीय वेळेनुसार 30 एप्रिल, 2022 च्या रात्री (1 मे 2022 ची सकाळ) 00:15:19 पासून सुरु होऊन प्रातः काळी 04:07:56 वाजेपर्यंत राहील. एप्रिल च्या महिन्यात लागणारे सूर्य ग्रहण 2022 आंशिक सूर्य ग्रहण असेल.
अंटार्क्टिका शिवाय हे सूर्य ग्रहण अटलांटिक प्रदेश, पॅसिफिक महासागर आणि दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागात दिसणार आहे. हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या सूर्य ग्रहणाचा धार्मिक परिणाम आणि सुतक भारतात वैध असणार नाही.
या नंतर 25 ऑक्टोबरला वर्षातील दुसरे सूर्य ग्रहण दिसणार आहे. ते ही केवळ आंशिक सूर्य ग्रहण असेल. त्याच्याबद्दल अधिक माहितीसाठी आमच्याशी कनेक्ट रहा कारण, आम्ही त्यावर ही एक विशेष लेख सादर करणार आहोत.
सूर्य ग्रहण काय आहे?
आपण अशा विश्वात राहतो ज्यामध्ये अनेक प्रकारचे ग्रह आपापल्या कक्षेत फिरतात. आपल्या आकाशगंगेमध्ये अनेक ग्रह सूर्य देवाभोवती फिरतात, ज्यामध्ये आपली पृथ्वी आणि पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीच्या कक्षेत फिरतो. कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण होते की, जेव्हा पृथ्वी आपल्या कक्षेत फिरत असते आणि चंद्र ही आपल्या कक्षेत फिरत असतो, तेव्हा एक वेळ अशी येते की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अशा स्थितीत येतात.
सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर थेट पोहोचत नाही कारण, चंद्र त्याच्या मध्यभागी येतो. अशा स्थितीत निर्माण होणाऱ्या घटनेला सूर्य ग्रहण म्हणतात.
ही एक महत्त्वाची घटना आहे जी ताऱ्यांच्या हालचालीमुळे घडते आणि काही वेळा आपण ते स्पष्ट डोळ्यांनी पाहू शकतो तर, ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रहण हा एक विशेष कालावधी आहे ज्या दरम्यान एखाद्या विशिष्ट ग्रहाचे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव प्राण्यांवर दिसून येतात.
काय असते आंशिक सूर्य ग्रहण
हिंदू कॅलेंडरनुसार, अमावस्येच्या दिवशी सूर्य ग्रहण आकार घेते. हे अनेक प्रकारचे असू शकते जसे की, संपूर्ण सूर्य ग्रहण, आंशिक सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण. 30 एप्रिल 2022 रोजी होणारे सूर्य ग्रहण हे आंशिक सूर्य ग्रहण आहे कारण, या ग्रहण दरम्यान चंद्र आणि पृथ्वी मधील अंतर जास्त असेल, ज्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वी पर्यंत पोहोचण्यापूर्वी सूर्याचा काही भाग चंद्रापर्यंत पोहोचेल. पृथ्वी प्रभावित होईल आणि संपूर्ण सूर्य ग्रहण होणार नाही. यामुळेच याला आंशिक सूर्य ग्रहण म्हटले जाईल.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
खग्रास सूर्यग्रहणाचे ज्योतिषीय समीकरण
30 एप्रिल 2022 रोजी होणारे सूर्य ग्रहण मेष आणि भरणी नक्षत्रात आकार घेईल. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे जो त्या दिवशी कुंभ राशीत शनि सोबत स्थित असेल तर, भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे जो त्या दिवशी मीन राशीत गुरू सोबत स्थित असेल. अशा प्रकारे मेष आणि भरणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर या ग्रहणाचा विशेष प्रभाव राहील. तथापि, विशेषत: ग्रहणाचा प्रभाव त्या लोकांवर दिसून येईल, जे त्या ठिकाणी राहतात, जेथे ग्रहण दिसेल कारण, असे मानले जाते की जेथे ग्रहण दिसत आहे, त्याचा सुतक कालावधी आणि प्रभाव वैध आहे, उर्वरित भागांवर नाही.
मेष राशी मध्ये सूर्य देव त्याच्या उच्च आणि बलवान स्थितीत मानला जातो. अशा स्थितीत राहु केतूच्या प्रभावाखाली असलेला उच्चारित सूर्य आणि ग्रहणाच्या प्रभावाखाली येण्यामुळे सूर्य देवाच्या प्रभावावर विशेष परिणाम होऊ शकतो आणि या ग्रहणाच्या प्रभावामुळे विशिष्ट क्षेत्रांवर विशेष प्रभाव दिसून येईल.
सूर्याला जगाचा प्राण, आत्मा आणि सरकार किंवा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती म्हणून पाहिले जाऊ शकते तर, चंद्राचे प्रतिनिधित्व राणी, मन आणि पाणी द्वारे केले जाते. अशा स्थितीत जेव्हा अमावस्येच्या वेळी सूर्य आणि चंद्र एकत्र असतात आणि राहू केतूच्या प्रभावामुळे ग्रहण होते तेव्हा या दोघांच्या प्रभावा मध्ये काही फरक असतो जो मानवी जीवनावर परिणाम करण्यास सक्षम आहे.
सूर्य ग्रहणाच्या वेळी सूर्य आपल्या उच्च राशी मेष मध्ये चंद्र आणि राहू सोबत स्थित होतील तसेच, केतू तुळ राशीमध्ये स्थित होतील. तसेच, बुध महाराज कुंडली मध्ये वृषभ राशीमध्ये तसेच मंगळ आणि शनी ची युती कुंभ राशीमध्ये असेल आणि देव गुरु बृहस्पती आणि दैत्य गुरु शुक्र देव मीन राशीमध्ये स्थित होतील.
ज्या ज्या क्षेत्रात या ग्रहणाचा प्रभाव पडेल अर्थात हे ग्रहण दृश्य मान होईल तिथेच विशेष रूपात याचा प्रभाव दर्शनीय असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही म्हणून, याचा काही प्रत्यक्ष प्रभाव भारतात दिसणार नाही परंतु, जगामध्ये इतर देशात याचा प्रभाव दृष्टी संक्रमण होईल ज्याच्या परिणाम स्वरूप, अप्रत्यक्ष रूपात भारत देश ही प्रभावित होऊ शकतो. हे सूर्यग्रहण कोणते परिणाम देऊ शकते किंवा कोणत्या भागात त्याचा प्रभाव दिसून येतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
खग्रास सूर्य ग्रहणाचे देश आणि जगावर प्रभाव
हे खंडग्रास म्हणजेच आंशिक सूर्य ग्रहण आहे जे मेष आणि भरणी नक्षत्रात आकार घेत आहे. खंडग्रास सूर्य ग्रहणाचा मुख्य प्रभाव ज्या देशांची राशी मेष आणि भरणी नक्षत्र आहे त्यांच्यावर होईल. त्या देशांत शक्तीचा कारक म्हटल्या जाणार्या सूर्याच्या उपस्थितीमुळे अशा काही दडपशाही योजना केल्या जातील ज्यामुळे लोकांच्या मनात अविश्वास निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दूरगामी होतील कारण, या आपसी संघर्षामुळेच काही मोठ्या राष्ट्रांमध्ये बदल पहायला मिळेल. काही ठिकाणी सरकार बदलण्याची म्हणजेच सत्तापालट होण्याची शक्यता आहे. सरकारकडून काही कठोर दडपशाही धोरणे ही अवलंबली जातील, ज्यांना जनतेचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे विरोध होईल. हे ग्रहण अत्यंत प्रभावशाली नेत्यासाठी अत्यंत क्लेशदायक ठरू शकते आणि त्यांच्या प्रकृतीला ही त्रास होऊ शकतो.
या सूर्य ग्रहणाचा प्रभाव अशा लोकांवर जास्त असेल जे कोणत्या ही प्रकारच्या सैन्यात कार्यरत आहेत किंवा लग्नासारख्या कार्यात गुंतलेले आहेत. वेडिंग प्लानर, मॅनेजर, टेंट हाऊस, सुरक्षा एजन्सी इत्यादींशी संबंधित काम करणाऱ्या लोकांवर या ग्रहणाचा विशेष प्रभाव पडेल. हे ग्रहण स्त्रियांकडे विशेष लक्ष देण्यासारखे आहे, ज्यांच्या आरोग्यावर आणि खर्च करण्याची प्रवृत्ती विशेष प्रभाव पाडेल.
मेष हे अग्नी तत्वाची राशी आहे. या मध्ये सूर्य अग्नी तत्वाचे तर चंद्र जल तत्वाचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे ग्रहण होईल तेव्हा मेष राशीचा प्रभाव पडेल, त्यामुळे काही ठिकाणी आग लागण्याची शक्यता आहे.
वर उल्लेख केलेल्या भागात राहणाऱ्या लोकांनी आपल्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी रोज ध्यान धारणा केली पाहिजे कारण, असे केल्याने तुम्ही तुमचे मन बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवून चांगल्या स्थितीत पुढे जाऊ शकतात. जर तुम्हाला कोणत्या ही प्रकारची आरोग्य समस्या जाणवत असेल तर, उशीर न करता तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला कोणत्या ही प्रकारचा त्रास होऊ नये.
सूर्य ग्रहणाने या तीन राशींना होईल फायदा
जेव्हा जेव्हा सूर्य ग्रहण होते तेव्हा ते चांगले मानले जात नाही परंतु, ते नेहमीच अशुभ असावे, हे आवश्यक नाही परंतु, काही विशेष राशींसाठी सूर्य ग्रहण शुभ परिणाम देखील आणू शकते. 30 एप्रिल 2022 चे सूर्य ग्रहण ज्या तीन राशींसाठी खूप चांगले असेल त्यात मिथुन, कन्या आणि कुंभ यांचा समावेश आहे. या सूर्य ग्रहणात कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
या खंडग्रास सूर्य ग्रहणाच्या शुभ प्रभावाबद्दल बोलायचे झाले तर, मिथुन, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांना या सूर्य ग्रहणाचे शुभ परिणाम मिळतील.
- मिथुन राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला काही विशेष लाभ ही मिळू शकतात. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि पैशाशी संबंधित समस्या संपतील.
- कन्या राशीच्या लोकांना अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. बरेच दिवस रखडलेले काम पूर्ण केल्यावर तुमच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसेल. तथापि, या काळात आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे.
- कुंभ राशीच्या लोकांचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. तुमच्या व्यवसायात भरभराट होईल आणि तुमच्या योजना फलदायी ठरतील. नोकरदार लोकांना त्यांच्या कामात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे कार्य क्षेत्रात तुमचे स्थान मजबूत होईल.
या सूर्यग्रहणा पासून या तीन राशींनी राहावे सावधान
हे सूर्य ग्रहण मेष राशीत होत आहे, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण, त्यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि मानसिक तणाव देखील त्यांना त्रास देऊ शकतो.
सिंह राशीच्या लोकांनी लांबच्या प्रवासाला काळजीपूर्वक जावे कारण, आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आणि प्रवास दरम्यान कोणत्या ही प्रकारची अस्वस्थता त्रास देऊ शकते. या दरम्यान, नशीब कमकुवत असल्यामुळे आदर कमी होऊ शकतो.
मकर राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. कौटुंबिक कलहाचा जन्म होऊ शकतो आणि कुटुंबात आईचे आरोग्य बिघडू शकते. याचा तुमच्या कामावर ही परिणाम होण्याची शक्यता आहे.
खंडग्रास सूर्य ग्रहणासाठी उपाय
वैदिक ज्योतिष शास्त्रात, सूर्य देवाला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे कारण, तो नऊ ग्रहांचा राजा आहे आणि त्याला जगाचा आत्मा म्हटले जाते. सूर्य देवाच्या प्रभावामुळे सजीवांना आरोग्य मिळते. अशा परिस्थितीत जेव्हा सूर्य ग्रहण होते तेव्हा सूर्याची तेजोवलय कमी होते, त्यामुळे सूर्य ग्रहणाचे नकारात्मक प्रभाव टाळता यावे आणि सूर्याची कृपा कायम राहावी यासाठी काही विशेष उपाय करावे लागतात.
या शिवाय सूर्य ग्रहणाच्या काळात काही विशेष मंत्रोच्चार आणि विधी खूप यशस्वी होतात. या काळात उपाय केल्याने तुम्हाला त्यांचा चांगला फायदा होतो आणि सूर्य देवाची कृपा प्राप्त होते. चला जाणून घेऊया कोणते आहेत ते खास उपाय:
- सूर्य ग्रहण (Surya Grahan 2022) दरम्यान सूर्य देवाची पूजा करणे सर्वात योग्य आहे सूर्य ग्रहणाच्या वेळी या मंत्राचा जप करणे विशेष फलदायी ठरेल: "ओम आदित्यय विदमहे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य: प्रचोदयात".
- आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी, सूर्य ग्रहण काळात, भगवान शिवाला समर्पित महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.
- ग्रहणकाळात धर्मग्रंथांच्या अभ्यासात आणि देवाकडे मन लावावे.
- सूर्य ग्रहण काळात विशेष दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते आणि पवित्र नद्या आणि संगमावर स्नान करणे हे देखील एक महत्त्वाचे पुण्य मानले जाते.
- भगवान शिव यांना जगाचा पिता म्हटले जाते, त्यामुळे सूर्य ग्रहणाच्या वेळी भगवान शिवाच्या कोणत्या ही मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
- जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर, सूर्य ग्रहणाचा काळ त्याच्यासाठी ही खूप फायदेशीर आहे कारण, या काळात अनेक हजार पटींनी फल प्राप्त होते.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2023
- राशिफल 2023
- Calendar 2023
- Holidays 2023
- Chinese Horoscope 2023
- Education Horoscope 2023
- Purnima 2023
- Amavasya 2023
- Shubh Muhurat 2023
- Marriage Muhurat 2023
- Chinese Calendar 2023
- Bank Holidays 2023
- राशि भविष्य 2023 - Rashi Bhavishya 2023 Marathi
- ராசி பலன் 2023 - Rasi Palan 2023 Tamil
- వార్షిక రాశి ఫలాలు 2023 - Rasi Phalalu 2023 Telugu
- રાશિફળ 2023 - Rashifad 2023
- ജാതകം 2023 - Jathakam 2023 Malayalam
- ৰাশিফল 2023 - Rashifal 2023 Assamese
- ରାଶିଫଳ 2023 - Rashiphala 2023 Odia
- রাশিফল 2023 - Rashifol 2023 Bengali
- ವಾರ್ಷಿಕ ರಾಶಿ ಭವಿಷ್ಯ 2023 - Rashi Bhavishya 2023 Kannada